नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. होय, तुमच्यासाठी ही योजना काय आहे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच विविध योजना राबवते. (Bhausaheb Fundkar Falbag Anudan yojana 2022)

तर बाग योजना ही त्यापैकीच एक. गेल्या तीन वर्षांपासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना कोरोनामुळे बंद होती. मात्र आता ही योजना पुन्हा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चला तर मग पाहूया या योजनेच्या अटी काय आहेत, कोण लाभ घेऊ शकतात आणि कोणत्या जिल्ह्यात ही योजना लागू आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळेल. (Falbag Anudan yojana)

कोरोनामुळे बंद पडलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला 10 दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. शासनाने फळबागांसाठी 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजीपाला व पशुसंवर्धनाबरोबरच फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना 1990 पासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना ५ एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या लोकांना लागू आहे. अल्प भूधारकांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. परंतु जे शेतकरी जॉब कार्डधारक नाहीत ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.


जिल्हा निहाय आर्थिक मंजुरी

ठाणे – 94 लाख 3400

पालघर – 1कोटी 07 लाख 74000

रायगड – 2 कोटी 12 लाख 44000

रत्नागिरी –  3 कोटी 29 लाख 96000

नाशिक – 5 कोटी 6 लाख 32000

धुळे – 1 कोटी 99 लाख 56000

नंदुरबार – 1कोटी 33 लाख 70000

जळगाव – 3कोटी 61 लाख 44000

पुणे – 5 कोटी 52 लाख

सोलापूर – 5 कोटी 87 लाख

सातारा – 4 कोटी 92 लाख 4900

सांगली – 3 कोटी 63 लाख  67000

कोल्हापूर – 3 कोटी 54 लाख 70000

औरंगाबाद – 3 कोटी 91 लाख 5000

जालना – 3 कोटी 26 लाख 4900


योजनेच्या अटी व पात्रता – 

कोकण विभागात १० गुंठे पासून तर अन्य विभात 20 गुंट्यापासून फळबागेची लागवड करता येईल.

जास्त शेती असेल तर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावता येणार आहेत.

मनरेगा लाभार्थीना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या पूर्वी जर लाभार्थीना लाभ मिळाला असेल तर परत लाभ मिळणार नाही.