वायफळेत कोट्यवधींची विकासकामे प्रगतीपथावर.!

येत्या काळात गावाला स्वच्छ व मुबलक पाणी देणार : सुखदेव पाटील




तासगाव  (प्रतिनिधी) : गावात आज विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.तर अन्य विकासकामांना तत्वतः प्रशासकीय मंजुरी मिळवली असून येत्या काळात या उर्वरित कामांचा त्वरित पाठपुरावा करणार आहे.गावातील ग्रामस्थांच्या शेतीला पाणी देण्याबरोबरच गांवासह वस्ती भागाला स्वच्छ व मुबलक पाणी देण्याची योजना आज युद्धपातळीवर सुरू आहे.गावातील बाळासाहेब देसाई हायस्कुलजवळ व घोडके मळ्यात लवकरच पाणी फिल्टर प्लॅन्ट उभा राहणार असून गावातील ग्रामस्थांच्या स्वप्नातील हायस्कुलच्या प्रशस्त इमारतीचे बांधकामही लवकरच पूर्णत्वास जाणार असून येत्या काळात हायस्कुल बरोबरच उच्च-माध्यमिक विद्यालयासाठी प्रयत्नशील राहणार आहे.तेव्हा तुम्ही सर्व सूज्ञ मतदारांनी माझ्यासह आपल्या पॅनलच्या श्री खंडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करावे व गावाची पुन्हा  सेवा करण्याची संधी देऊन विजयाची 'हॅट्रिक 'साधावी असे आवाहन थेट सरपंच पदाचे उमेदवार सुखदेव पाटील यांनी केले.


ते म्हणाले,क्रियेविना वाचाळिता व्यर्थ आहे'!या उक्तीचा पाठलाग करून आजवर ध्येयाने व दूरदृष्टी ठेवून काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.तुम्ही सर्व लहान-थोर मंडळी व माता-भगिनींनी आजवर मला तुमच्या मतांतून आशीर्वाद दिलेलेच आहेत.यापुढेही तुमचा आशीर्वाद रुपी हात माझ्या डोक्यावर राहील याची मला खात्री आहे.निवडणूकित सरपंच निवड ही थेट जनतेतून व,तुमच्या सार्थकी ठरणाऱ्या मताच्या माध्यमातून होणार आहे.या निवडणुकीत मी स्वतः सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहे.माझी निवडणूक चिन्ह नारळ हे असून आपल्या श्री खंडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांची निवडणूक चिन्ह अंगठी,टेबल व छत्री ही आहेत.तुम्ही सर्व मतदारांनी या चिन्हासमोरील बटन दाबून माझ्यासह आपल्या पॅनेलचे पाचही  वार्डातील उमेदवाराना विजयी करावे.व सर्वांगीण चौफेर प्रगतीसाठी मोलाचे योगदान द्यावे अशी मी आपणांस या माध्यमातून विनंती करतो.


आपले सर्व प्रभागातील सर्व सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अडी-अडचणीला धावून जाऊन मदत करणारे आहेत.सुशिक्षित व साक्षर आहेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण वेळ स्वतःला  झोकून देऊन काम करणारे आहेत.तुमचे बहुमूल्य मत आपल्या पॅनलच्या उमेदवाराना देऊन मला व त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या.!मागील दहा वर्षे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे.यंदाही आपल्या श्री खंडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करून तुम्हा-मतदारांना विजयाची हॅट्रिक साधायची आहे.गेल्या दहा वर्षे सत्ता असताना गावाला कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून खेचून आणला आहे.गावाची वाटचाल विकास पर्वाकडे सुरू आहे.गावातील अनेक कामे आज युद्धपातळीवर सुरू आहेत.येत्या काही दिवसात ही कामे पूर्णत्वास जाणार आहेत व  गावाच्या सर्वांगीण व चौफेर प्रगतीत निश्चितच भर पडणार आहे.


आज गावात व वस्ती भागात नागरी सुविधा योजनेच्या माध्यमातून 45 लाखांची कामे प्रगतीपथावर आहेत.यात प्रामुख्याने जनसुविधा योजनेच्या माध्यमातून 23 लाख रुपये किमतीची कामे,14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून70 लाख,


2515 मधून दहा लाख स्वच्छ भारत ग्रामीण अभियान व अ जा व न घ व वि मधून 21 लाख रुपये किमतीची ,15 व्या वित्त आयोगातून 21 लाख 31 हजार व जल जीवन मिशन अंतर्गत75 लाख ,ग्रामनिधी योजनेंतर्गत व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सवा दोन कोटी रुपयांची कामे सुरू आहेत.येत्या काळात ही सर्व कामे पूर्ण करणार आहे.


गावात व वस्तीवर असं एकही काम शिल्लक ठेवलं नाही की जिथं शासकीय योजना राबवली गेली नाही,आजवर विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून अनेक कामे आज पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहेत.व उर्वरित जी कामे प्रलंबित आहेत त्या कामांना गती देण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. तेव्हा आपलं बहुमूल्य मत  माझ्या 'नारळ' या चिन्हांसमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा व  आपल्या श्री खंडेराया-सिद्धेश्वर पॅनलच्या अंगठी,टेबल व छत्री या चिन्हसमोरील बटन दाबून आपले उमेदवार भरघोस मतांनी विजयी करा. असे आवाहन त्यांनी केले.


गावात अनेक संस्था उभारल्या आहेत .व त्या सक्षमपणे व पारदर्शी चालवून आदर्श संस्था म्हणून अल्पावधीत नावारूपाला आणल्या आहेत.या विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक गरजू होतकरू व सर्वसामान्य जनतेचे आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.कै. संध्याराणी दूध संस्था, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन पाहता  अत्याधुनिक शितगृह गरज लक्षात घेऊन  खंडेराया कोल्डस्टोरेज ची उभारणी केली आहे. सर्वसामान्यांना पतपुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी दिनकर आबा पाटील नागरी सह. पतसंस्थेची उभारणी केली.200 कोटी रूपयावर वार्षिक उलाढाल असणाऱ्या या पतसंस्थेत वीज बिल स्वीकारणे,सेफ डिपॉझिट लॉकर, अत्याधुनिक सायरन,संगनकीकरण,सीसीटीव्ही  यासह विविध सुविधा उपलब्ध करून गावच्या नावलौकिकात भर टाकली आहे.डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या भव्य देखण्या इमारती  उभारल्या आहेत. तरुण पिढीला सदृढ आरोग्य लाभावे  म्हणून  अत्याधुनिक व्यायाम  साधने असणारी व्यायामशाळा,लाल मातीतील कुस्ती जोपासण्यासाठी कुस्ती आखाडा उभारला.या तालमीत ,व्यायाम शाळेत खेळलेले अनेक 'पट्टे 'आज शासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करत आहेत.याचा  माझ्यासह गावाला सार्थ अभिमान आहे. शेतीसाठी वीजेची गरज लक्षात घेऊन गावाला स्वतंत्र्य 33 के व्ही वीज उपकेंद्र उभारले व वायफळे सह आसपासच्या गावांची ही गैरसोय दूर केली.या सह शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गावात मोठ्या हिमतीने राबवून गाव विकासाकडे नेण्याचे कार्य अविरत सुरू आहे वायफळे हा गाव अल्पावधीत  रोल मॉडेल ठरेल.व जिल्ह्यातील एक आदर्श,संस्कारक्षम गांव म्हणून  आपल्या गावाचा नामोल्लेख अभिमानाने केला जाईल अशा रीतीने  हातात हात घालून काम करूया असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.यावेळी सरपंच पदाचे उमेदवार सुखदेव पाटील यांच्या सह सर्व उमेदवार, मतदार बंधू भगिनी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या