सरपंच इंदूमती जाधव निर्दोष, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निकाल

हिम्मत जाधव यांच्यासह ६ तक्रारदारांचे अपिल फेटाळल

विटा : आळसंद ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.इंदूमती शहाजीराव जाधव यांच्या कारभाराविरोधात तक्रारदार हिम्मत बाजीराव जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, जयदिप जयसिंग पाटील,विक्रम युवराज जाधव व संदिप पांडुरंग दंडवते यांनी दाखल केलेल्या अपीलालावरती सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच इंदूमती जाधव या निर्दोष असल्याचा महत्वपुर्ण निकाल दिला आहे.तसेच हिम्मत जाधव यांच्यासह ६ तक्रारदारांचे अपील न्यायालयाने फेटाळून लावली आहे.यामुळे सरपंच इंदूमती जाधव यांचा कारभार योग्य असल्याचे सिध्द झाले आहे. 

या संपुर्ण खटल्याची माहिती देताना, नितीनराजे शहाजीराव जाधव यांनी सांगितले की, कलम ३९ अन्वये ग्रामपंचायतमधील कारभाराच्या अनुषंगाने कारवाई सरपंच इंदूमती जाधव यांच्या करुन सरपंच पद रद्द करावे,यासाठी तक्रारदार हिम्मत बाजीराव जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, जयदिप जयसिंग पाटील, विक्रम युवराज जाधव व संदिप पांडुरंग दंडवते यांनी २०१७ पासून विभागीय आयुक्त पुणे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.त्यावर विभागीय आयुक्त यांनी आळसंद ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश दिले होते.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या कार्यालयाकडून आळसंद ग्रामपंचायतची २ ते ३ वेळा दफ्तर तपासणी करण्यात आली.त्यात त्यांना कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही.मात्र ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांनी केलेल्या चुकीच्या कारभारामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते तर सरपंच इंदूमती जाधव यांनी दाखल केलेले सर्व पुरावे तपासल्यानंतर त्या निर्दोष असल्याचा निकाल दिला होता.यावरती हिम्मत बाजीराव जाधव, यांच्यासह ६ तक्रारदारांनी गामविकास मंत्रालय विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

त्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयाने सुध्दा सरपंच या निर्दोष असल्याचे म्हटले होते.मात्र या निर्णयावर देखील हिम्मत जाधव यांच्यासह सर्वच तक्रारदारांनी मुबंई उच्च न्यायायलयात सरपंच इंदूमती जाधव यांच्याविरोधात अपील दाखल केले होते.या अपिलावर दि.७ डिसेंबर २०२२ रोजी सुनावणी करताना मा.उच्च न्यायालयाने आळसंद च्या लोकनियुक्त सरपंच सौ.इंदूमती जाधव या निर्दोष असल्याचा महत्वपुर्ण निर्णय देताना हिम्मत बाजीराव जाधव, अभिनंदन हिम्मत जाधव, खंडेराव लक्ष्मण जाधव, जयदिप जयसिंग पाटील,विक्रम युवराज जाधव व संदिप पांडुंरग दंडवते या सर्व तक्रारदारांचे अपील फेटाळून लावले आहे.या खटल्यांमध्ये अॅड.उमेश आर मानकापुरे यांनी सरपंच इंदूमती जाधव यांच्या बाजूने न्यायालयीन कामकाज पाहिले.मुबंई उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्वपुर्ण निर्णयावर सरपंच इंदूमती जाधव यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना नितीनराजे जाधव यांनी सांगितले की, आळसंद गावच्या सरपंच इंदूमती जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात आम्ही गावामध्ये विकासकामांचा डोंगर उभा केला.पंरतु केवळ राजकीय द्वेषापोटी गावातील विरोधकांनी व त्यांच्या नेत्यांनी जाणिवपुर्वक भ्रष्टाचारी निलंबित ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांना हाताशी धरुन त्यांच्याकरवी आमच्या कुटुंबाला बदनाम करुन त्रास देण्याचा प्रयत्न केला.ह्या सर्व षढयंत्राविरुद्ध श्रीनाथ साहेबांच्या कृपेने व आळसंदमधील जनतेच्या आशिर्वादामुळे मुंबई उच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या