सत्ता प्रतिष्ठेसाठी नको सेवेसाठी द्या! : सुखदेव पाटील

खंडेराया -सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेलचे आवाहन



वायफळे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीवर  निर्विवाद वर्चस्व ठेवून सत्तेचा वापर प्रतिष्ठेसाठी न करता  नेहमीच सेवेसाठीच केला आहे.यापूढेही खासदारांच्या माध्यमातून हे गांव अल्पावधीत विकासाचे 'रोल मॉडेल 'करणार आहे.यंदा सर्वसाधारण पुरुष गट खुला आरक्षण असल्याने व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच या निवडणुकीत स्वतः उभा आहे.तुम्ही आजवर माझ्यावर व खासदार संजय काका पाटील यांच्यावर विश्वास टाकलाच आहे तो सार्थ करत असताना जीवाचे रान करून पळालो व कामांना मंजुरी मिळवली. उर्वरित कामेही येत्या काळात मार्गी लावणार आहे.तेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.तुम्ही सर्व मतदार मंडळी माझ्यावर विश्वास दाखवाल व प्रचंड मतांनी आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील याचा विश्वास आहे  असे मत खंडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनेल प्रमुख सुखदेव पाटील यांनी केले.


ग्रामपंचायत निवडणूक प्रचार शुभारंभावेळी ते बोलत होते.गावात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.आगामी काळात गोरगरीब जनतेला आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात सरपंच सहाय्यता योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजवर गटा-तटाच्या , राजकारणात गावचे खूप नुकसान झाले याची नेहमीच मनाला खंत वाटते.पण आता केंद्रात,राज्यात  भाजपाची सत्ता आहे.गावात पण सत्ता दया. सर्वांनी आपल्या पॅनलच्या खंडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना साथ दया.गांव आदर्श करू.जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम केलं अनुभव पाठीशी आहे.ग्रामपंचायतीवर सत्ता होती त्या काळात अनेक कामांना मंजुरी मिळवली आहे.काही कामे ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.त्यामुळे येत्या काळात गावात एकही काम शिल्लक ठेवणार नाही.अल्पावधित हे गाव सुजलाम सुफलांम करू माझे उर्वरित सर्व आयुष्य हे गावाचा सर्वांगीण विकास व पाणी ,शिक्षण व तरुणांना स्वयंपूर्ण करणे  यांसाठीच आजवर खर्ची पडले यापूढेही ते पडेल याची यानिमित्ताने मी आपणास खात्री देतो. तेव्हा माझ्या सरपंच पदाचे निवडणूक चिन्ह नारळ, व आपल्या पॅनलच्या अधिकृत उमेदवारांचे निवडणूक चिन्ह असणाऱ्या अंगठी,टेबल,व छत्री या चिन्हसमोरील बटन दाबून माझ्यासह  आपल्या पँनलच्या सर्व  उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

गावातील कुलदैवत खंडेराया,ग्रामदैवत सिद्धेश्वर,विठ्ठल रखुमाई  व दत्त मंदिर  येथे श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ झाला.महिला , तरुणवर्ग, यांनी गावात  पद यात्रा काढली.यावेळी खडेराया-सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनल चे  सर्व उमेदवार , ग्रामस्थ व महिला वर्ग, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या