खानापूरचा भावी आमदार मीच असणार! आटपाडीच्या पाटलांनी फोडली डरकाळी




(महादेव धनवडे, 99706 76312) : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी सर्वसामान्यांच्या ताकतीवर ही निवडणूक लढवत असून आपण यावेळी ताकतीने लढणार आहे. खानापूरचा भावी आमदार मीच असणार अशी प्रतिक्रिया युवा नेते संभाजी पाटील यांनी SB मराठी च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

खानापूर आटपाडी मतदारसंघातून युवा नेते किंग मेकर माणदेशी मातीतील कोहिनूर हिरा संभाजी शेठ पाटील विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. खानापूर आटपाडी विधानसभेसाठी नवीन चेहरा म्हणून संभाजी शेठ पाटील यांच्याकडे जनता पाहत आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उगवते नेतृत्व म्हणून संभाजी शेठ पाटील यांच्याकडे नागरिकांच्या आशा आहेत.

जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच माझे ध्येय आहे. असे सांगत जनतेचा विश्वास संपादन करत आहेत. गेले पाच वर्षाच्या काळात सातत्याने खानापूर विधानसभा मतदारसंघात लोक उपयोगी कामासाठी मदत केली आहे. संभाजीशेठ पाटील यांना खानापूर तालुक्यातून मानणारा मोठा वर्ग आहे.

संभाजी पाटील म्हणाले, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून प्रतिकूल स्थितीवर मात करून कष्टातून इथेपर्यंत पोहोचलो आहे. शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही ते शक्य झाले नाही. रोजगाराच्या हेतूने तामिळनाडू राज्यात काम केले. कर्मभूमी म्हणून लोकांचा विश्वास आणि प्रेम सार्थ ठरविला. तेथे लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले. मागील काही वर्ष आटपाडी तालुक्यात सकारात्मक विचारातून सामाजिक कार्य करत आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा शेतकऱ्यांना न्याय मिळावा सामान्य जनतेची उन्नती व्हावी यासाठी मी सातत्याने काम करत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी उपोषणदेखील केले. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या भूमिकेला खानापूर विधानसभा मतदारसंघातून सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी संभाजी पाटील यांनी केली. मी कोणालाही कधीही अंतर देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहीन अशी ग्वाही संभाजी पाटील यांनी दिली.

त्यांनी खानापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यांना जनतेची सहानुभूती मिळताना दिसत आहे. आजपर्यंत आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम केले. याची पोचपावती मला या विधानसभा निवडणुकीत मिळेल याची शाश्वती आहे. आपण सर्वसामान्य जनतेची उमेदवार आहोत. जाईल तिथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली असल्याने आता जनतेला चांगला पर्याय मिळाला आहे. आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडून येणार असल्याचे सर्वसामान्य नागरिक सांगताना दिसत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या