राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या वैभव पाटील यांनी बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे. संपूर्ण मतदार संघात वैभव पाटलांचा झंजावात चालू आहे. खानापूर तालुक्यातील वाळुज, लेंगरे, पारे, कार्वे येथील विरोधी गटातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यास वैभव पाटील यांना यश मिळत असून विरोधकांना धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत.
विधानसभा निवडणुक जस जसी जवळ येत आहे तसे खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे युवा नेतृत्व वैभव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करण्यासाठी विविध खानापूर तालुक्यातील गावांमधून विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जेष्ठ, युवकांनी या झंझावात नेत्याला पाठिंबा देऊन आगामी निवडणुकीत खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे वैभव पाटील च आमदार होतील असा नारा देत वैभव दादा चे नेतृत्व स्विकारु लागले आहेत.
आज खानापूर तालुक्यातील एक संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते याच कार्वे गावातील शेकडो लोकांनी सदाशिवराव भाऊ पाटील व धडाकेबाज नेतृत्व वैभव दादा पाटील यांच्या दमदार कामगिरी पाहून येथील मा उपसरपंच सुनिल तात्या जाधव, गणेश तानाजी पाटील शेठ, संदिप विनायक जाधव ग्रामपंचायत सदस्य, रणजित शहाजी माळी ग्रामपंचायत सदस्य, विवेक तानाजी पाटील,अमृत शहाजी माळी व माळी परिवार , रोहन जाधव , प्रफुल्ल कांबळे,गौरव कांबळे,धनाजी गुंजले,सोन्या मंडले, विशाल निकम, सतीश गुजले या युवा कार्यकर्त्यांनी आज पाटील गटात जाहीर प्रवेश करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैभव दादा ना कार्वे गावातून मताधिक्य देण्याची घोषणा केली यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार मा आमदार सदाशिवराव भाऊ पाटील व युवा नायक वैभव दादा पाटील यांनी केला.
यावेळी वैभव दादा नी गेले दहा वर्षांचा मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपली उमेदवारी आहे संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास करण्यासाठी माझी उमेदवारी असून मला महाराष्ट्रात विटा शहराप्रमाणेच संपूर्ण खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे नाव झळकावयाचे आहे तरुणांना रोजगार निर्मितीसाठी, आधुनिक शेती करून त्यास पूरक व्यवसायाची निर्मिती मला करायचे आहे शेतीमालावर प्रक्रिया पुरक उद्योग उभारून माझ्या परिसरातील लोकांचे राहणीमान मला सुधरावयाचे आहे यासाठी सदैव मी प्रयत्नशील आहे यामुळेच आज प्रत्येक गावात मला वाढता पाठिंबा मिळत आहे असे आवर्जून सांगितले.
यावेळी सदाशिवराव भाऊ पाटील यांनी आपल्या साथीने या परिसराचे नंदनवन करू व तालुक्यांचा थांबलेला विकास आधिकच्या स्पीड ने यापुढे वैभव दादा माध्यमातून नक्की केला जाईल असे आवर्जून सांगितले यावेळी कार्वे गावातील प्रमुख जेष्ठ युवक पाटील गटाचे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या