जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा : नितेश कराळे

इस्लामपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची, राज्याला नवी दिशा देण्याची क्षमता आहे. ते राज्याच्या सर्वोच्च पदी बसू शकतात. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ता नितेश कराळे (गुरुजी) यांनी रेठरेहरणाक्ष येथील जाहीर सभेत बोलताना केले. राज्य सरकारने निवडणूका डोळ्या समोर ठेवून महिला,शेतकरी,युवक आदी सर्व घटकांच्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या, त्या सगळ्या फसव्या आहेत. ही गद्दारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी शक्तींच्या विरोधातील लढाई आहे. राज्याचा स्वाभिमान मातीत घालणाऱ्यांना, मातीत गाडा, आवाहनही त्यांनी केले.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सर चिटणीस बाळासाहेब पाटील,तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,सरपंच शुभांगी बिरमुळे,उपसरपंच अभिजित मोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. कराळे म्हणाले, भाजपा भ्रष्टाचारी पार्टी झाला आहे. भ्रष्ट नेत्यांना वॉशिंग मशीन मध्ये साफ करून पक्षात घेत आहेत. मालवण चा छत्रपतींचा पुतळा पडला,कारण यांनी त्यातही पैसे खाल्ले आणि निकृष्ट काम केले. हा केवळ पुतळा पडला नाही, तर त्यांनी आपला स्वाभिमान मातीमोल केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला दर देण्याचे जाणीवपूर्वक टाळत आहेत. राज्यात ३-३ मामा असताना राज्यातील लाडके भाचे बेरोगजार आहेत. राज्यातील अनेक प्रकल्प गुजरात पळवीत आहे. हे का विरोध करीत नाहीत? राज्यात महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. आमच्या महिलांवर अन्याय- अत्याचार वाढले आहेत. मोदी-शहांनी अनेक संस्था,उद्योग मोडीत काढले आहेत. त्यांनी आपल्या राज्यावर वक्र दृष्टी आहे,सावध रहा. मी गेल्या ८ दिवसापासुन पवारसाहेबांच्या बरोबर राज्यात फिरत आहे. हा ८४ वर्षाचा योध्दा सर्वसामान्य माणसांचे सरकार आणण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहे. संपूर्ण राज्यातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यात निश्चितपणे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.
बी.जी. पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीवर आपला प्रपंच चांगला चालला आहे. आपली पोरं-बाळं शिकली आहेत. हा सहकार मोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. ते साखर कारखान्यावरून अप प्रचार करीत आहेत. जातीयवादी आणि गद्दारांचा राज्याला मोठा धोका आहे. आपण क्रांतिकारकांचे वारसदार आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीस मतदान करून हा धोका परतवून लावूया.
प्रारंभी माजी उपसरपंच उमेश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक दादासाहेब मोरे,दिलीपराव मोरे,कृष्णेचे संचालक जे.डी.मोरे,माजी संचालक माजी सुजित मोरे, जि.प.सदस्य धनाजी बिरमुळे, अँड.विवेकानंद मोरे,सुरेश पंडीत पवार, अविनाश मोरे,जयवंत मोरे,माजी उपसरपंच पतंगराव मोरे,सुहास पवार यांच्यासह संदीप जाधव यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या