विटा : विट्यातील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर भवानीनगर या नगरपरिषदेच्या शाळेच्या आवारात नशेच्या इंजेक्शन सापडल्याची बातमी आल्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी थेट शाळेतच धडक मारली. यावेळी त्यांनी अचानक दिलेल्या शाळेच्या भेटीनंतर धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेत १०० पट असलेल्या मुलांपैकी केवळ ३५ विद्यार्थी या शाळेत आढळून आले. तसेच शाळेची भयावह परिस्थिती देखील समोर आली.
शाळेच्या स्वच्छता गृहात अतिशय गैरसोय होती. या शाळेच्या परिसरात गवत देखील वाढलेलं होतं तसेच प्रचंड अस्वच्छता पसलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार सुहास बाबर यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्यास अधिकाऱ्यांना या गोष्टीचा जाब विचारला तसेच तातडीने यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या प्रकारानंतर आमदार सुहास बाबर यांनी आपला मोर्चा विटा शहरातील अनेक भागात वळवला. त्यावेळी कराड रोडवरील असणाऱ्या स्मशान भूमीत चिखलाच साम्राज्य होतं या ठिकाणाहून लोकांना येजा करणं कठीण बनल होतं याबाबत देखील तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यानी संबंधितांना दिल्यात.
आमदार सुहास बाबर यांनी माहिती देताना सांगितले की, वृत्तपत्रात या शाळेच्या आसपास अनेक ड्रग इंजेक्शन सापडल्याची बातमी वाचली त्यामुळे मी शाळेला भेट द्यायला आलो होतो. दुर्दैवान शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक अशी बघायला मिळाली. कारण अनेक शिक्षक अनुपस्थित होते. १०० पट शाळेच्या रेकॉर्डला आहे. पण, शाळेच्या वर्गामध्ये ३५-४० मुलांची देखील उपस्थिती नव्हती. मुलं खाली बसायला मुलांना बेंचेस नाहीत.
बालवाडीच्या दोन शिक्षिका दुसरी आणि चौथी, पहिली तिसरी पाचवी असे दोन वर्गामध्ये सगळे एकत्र बसवलेत आणि त्या दोन बालवाडीच्या शिक्षिका त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात अशी भयानक अवस्था या शाळेमध्ये होती. मला असं वाटत की ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आम्हाला सुद्धा ही गोष्ट घोषणावह नाही ड्रग्स हा विषय खूप लांबचा आहे.
शहरातल्या सर्वसामान्य माणसांच्या गरीब गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी ज्या शाळा आम्ही नगरपालिकेने उभ्या केल्या त्या शाळेमधले वास्तव खूप वेगळं आहे. आणि आम्ही आज प्रशासन अधिकारी राजे साहेब, सीओ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास माझी विनंती आहे की, सगळ्या शाळ्यांना भेट द्या आणि त्या ज्या शाळांमध्ये कोणत्या भौतिक सुविधा अपूर्ण असतील त्या पूर्ण करा.
स्वच्छतेचा प्रचंड मोठा अभाव आहे. विद्यार्थ्यांचा पट हा तेवढाच ठेवला जातो शिक्षकांची नोकरी टिकली पाहिजे तेवढा पट आणून द्यायची जबाबदारी फक्त शिक्षक पूर्ण करतायत. त्याच्या व्यतिरिक्त नवे ऍडमिशन घेतलं जात नाही. खूप वाईट अवस्था एवढी मोठी शाळा आहे. एवढं मोठं कॅम्पस याठिकाणी डेव्हलप केलाय पण दुर्दैवान या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत शिक्षकांची शिकवण्याची मानसिकता नाही पण कुठेतरी यात बदल झाला पाहिजे. आम्ही ताबडतोप आता याच्यामध्ये दुरुस्ती करून विद्यार्थी कसे येतील त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्यांना बेंचेस वगैरे सगळी भौतिक सोय द्यावी यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करू.
माझी शिक्षकांना विनंती की आपण पूर्ण लक्ष आपलं त्या कामावरती असावं. गोरगरीब लोकांची मुलं आता शिकतात त्या मुलांना जसं खाजगी शाळेमध्ये शिक्षण मिळत त्या पटीत इथे शिक्षण मिळावं ही आमची विनंती आहे.
0 टिप्पण्या