मतदारांनी मतदान शांततेत व निर्भयपणे करावे! : सुखदेव पाटील
राजेश पाटील (वायफळे) : खासदारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. उर्वरित मंजूर कामे थोड्याच दिवसात मार्गी लागणार आहेत.आगामी काळात गावात एक काम शिल्लक ठेवणार नाही.गावाच्या विकासासाठी आजपर्यंत सर्वस्व अर्पन करून झटत आलोय यापूढेही झटत राहीन असा मी या निमित्ताने तुम्हाला आज शब्द देतोय ही निवडणूक बिनविरोध करणेसाठी खूप प्रयत्न केला पण विरोधकांनी ही निवडणूक गावावर लादली आहे. आपला विजय दृष्टिक्षेपात आहे.मतदानासाठी फक्त दोन दिवस राहिलेत हे तुमचे महत्वाचे दोन दिवस मला व आपल्या पॅनलच्या उमेदवार यांच्यासाठी द्या आम्ही सर्व मंडळी पुढील पाच वर्षे तुमची निस्वार्थीपणे सेवा करू असा मी शब्द देतो.पुढील दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत.कुणीही गाफील राहू नका,डोळ्यात तेल घालून काम करा,तयारीला लागा,आपला विजय निश्चित आहे. असे मत खंडेराया सिद्धेश्वर ग्रामविकास प्यानेल प्रमुख व थेट सरपंच पदाचे उमेदवार सुखदेव पाटील यांनी केले.
प्रचार सांगता सभेत ते बोलत होते ते म्हणाले,माझ्या चांगल्या कामाची भर चौकात जाहीर कबुली देऊन गावचा विकासाला सुखदेव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असं चौकात सांगणारी मंडळी आज माझ्या चांगल्या जनहिताच्या कामाचा धसका घेऊन आज गल्ली बोळात माझ्यावर टीका करत फिरत आहेत.इथेच त्यांच्या नैतिकतेचा पराभव आहे हे दोन दिवस अतिशय महत्वाचे आहेत तेव्हा तुम्ही मतदारांनी जागरूक व दक्ष राहण्याची गरज आहे.सगळं गांव व गावातील सर्व लोकं ही आपली आहेत तेव्हा ही निवडणूक शांततेते पार पाडावी कुठेही ना निवडणुकीत गालबोट लागू नये याची खबरदारी प्रत्येकांनी घेऊन सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे असे मी तुम्हाला या निमित्ताने आज विनंती करतो आहे.
'मी विकासकाम करतो गावातील लोकांसाठी वेळ देऊन त्यांची काम करतो याच विरोधकांना पोटशूळ आहे. म्हणूनच काही लोकांनी ही निवडणूक गावावर लादली आहे'. प्रचारासाठी ठोस मुद्दा नसताना ही मंडळी निवडणूक लढवून माझ्यावर टीका टिप्पणी करत आहेत.त्यांच्या टीकेला मी महत्व देत नाही त्यात वेळ व शक्ती वाया न घालवता मी तीच ताकद विक्सकामात वापरणे योग्य समजतो.
जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद शेंडगे म्हणाले, सुखदेव पाटील ही अशी व्यक्ती आहे की ज्याने उभारलेली संस्था आज 200 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर करते.इतरांना आर्थिक मदत करते पण याच संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आजही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजही ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता दुचाकी वरून जीवावर उदार होऊन फिरतो, हे जिल्ह्यातील राजकारणातील एकमेव आदर्श उदाहरण आहे.कामाची तडफ व प्रदीर्घ असणारी ही अशी व्यक्ती की ज्याचा राजकारणात आम्ही लोक त्यांच्या आदर्श वाटचालीवर मार्गक्रमण करतोय अशा या सुखदेव पाटील यांचा आम्हाला सहवास व मार्गदर्शन लाभते हे आमचे भाग्य आहे.आज हीच व्यक्ती सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहे. कामावर निस्सीम भक्ती व श्रध्दा असणारी ही व्यक्ती गावचा सरपंच होणे व करणे गरजेचे आहे.त्यांना मतदान रुपी आशीर्वाद द्या व विक्रमी मतांनी विजयी करा. आजवर उभी हयात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तन मन व धन अर्पण करून काम करणाऱ्या विकासाचा महामेरू असणाऱ्या नेत्याला आपल्या सुखदेव पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा.सुखदेव पाटील येत्या काही दिवसात मंजूर कामे मार्गी लावतील.टेंभू उपसा सिंचन योजनेतून अग्रणी नदीत व तळेवस्ती तलावात पाणी टाकून शेतीच्या पान्याचा प्रश्न सोडवला जाईल गावात शांतता नांदेल .गावची चौफेर प्रगती होईल शेती हिरवीगार होईल.माझं व तुमचं शेतीच्या पाण्याच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचं रान करून फक्त सुखदेव पाटील हीच व्यक्ती हे सर्व कामे करू शकतो याचा मला विश्वास आहे.म्हणून त्यांना व त्यांच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा.
खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील म्हणाले,'जिल्ह्यातील काही गावात पाच वर्षात जिथं निधीच खर्ची पडत नाही अशी परिस्थिती असतांना वायफळे सारख्या गावात आज साडे सहा कोटी हुन अधिक निधींची रक्कम मिळवून कामे मार्गी लागतात व प्रस्तावित आहेत हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेऊन काम करणारी व्यक्ती सुखदेव पाटील हीच आहे .हे ओळखून व यंदा सरपंच पद खुले असल्याने स्वतः सरपंच पदासाठी सुखदेव पाटील यांना अर्ज भरायला खासदार संजय काका यांनी आदेश दिला व तो आदेश शिरसांवद्य मानून आज गावच्या विकासाची तळमळ असलेले सुखदेव पाटील स्वतः रिंगणात आहेत.त्यांना व त्यांच्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करा.
आपल्या खंडेराया -सिद्धेश्वर ग्रामविकास प्यानेलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या. सुखदेव पाटील यांचे निवडणूक चिन्ह नारळ हे असून त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांची चिन्हे अंगठी टेबल व छत्री ही आहेत,या चित्रासमोरील बटन दाबा व नव्या विश्वासू चेहऱ्यांना काम करण्याची संधी द्या,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष गुणवंत नलवडे, मधुकर पाटील,अविनाश पाटील,आनंदराव पाटील, दशरथ नलवडे,शंकर नलवडे,अशोक नलवडे माजी उपसरपंच, यांचे सह उमेदवार,महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या