खानापूर मध्ये सदाशिव पाटील की वैभव पाटील अद्यापही चर्चा सुरू

 


(महादेव धनवडे, 99706 76312) : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून खडाजंगी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. भाजपकडून आज महाआघाडीतील उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचीही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

40 हून जास्त जागांवर शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? याची संभाव्य यादी समोर आली होती त्यात खानापूर आटपाडी मतदारसंघात सदाशिवराव पाटील यांचे नाव असल्याने मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभेची तयारी करणाऱ्या वैभव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या धक्का बसला. अजूनही सदाभाऊ की वैभव पाटील रिंगणात उतरणार हा संभ्रम मतदारसंघात आहे. दोन दिवसांपासून सदाभाऊ, राजेंद्र अण्णा देशमुख आणि काही कार्यकर्ते मुंबईत ठाण मांडून आहेत. परंतु खानापूरचा हा तिडा सुटला नसल्याचे, वरिष्ठांशी बोलणं झालं नसल्याचे सूत्रांकडून समजते. मतदार संघात वैभव पाटीलच विधानसभा लढवणार हा विश्वास कार्यकर्त्यांना आहेच परंतु वैभव पाटील यांसे नाव अधिकृतपणे जाहीर झाले नसल्याने कार्यकर्त्यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. उद्या दुपारपर्यंत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होऊन जागावाटप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत अधिकृत यादीमध्ये वैभव पाटील यांचे नाव येण्याची वाट पहावी लागेल.

या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीतील वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत तातडीची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत शिवसेना ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या