गेल्या काही वर्षापासुन मंदी व कोरोना महामारीने वस्त्रोद्योग कमालीचा अडचणीत सापडला असुन तीन-चार वर्षापासुन कापसाच्या व सुताच्या दरातील अस्थिरता व साठेबाजी, संगनमताने होणारे गैरप्रकार, वीजेचे वाढलेले दर,
परदेशातून करचुकवेगीरी करुन आयात होणारे कापड, नोटबंदी,जीएसटी,प्रादेशीक व सहकारी-खाजगी उद्योगांतील शासकिय भेदभाव यासारख्या कारणाने व ,राज्य व केंद्र शासनाची चुकीची धोरणे व दुर्लक्षामुळे सात्तत्याने अडचणीतुन सुरु आहे.चालु वर्षामध्ये कोरोना व लाॅकडाऊनमुळे अनेक वेळा यंत्रमाग बंद ठेवावे लागले होते तर नुकसाणीमुळे शहरातील जवळपास शेकडो यंत्रमाग भंगारमध्ये विकले गेले असतानाही आपल्या कामगारांना दिवाळी साजरी करता यावी या विचाराने सदर बोनस देण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला आहे.
या बैठकीस यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर, बाबुराव म्हेत्रे,वैभव म्हेत्रे,शिवाजी कलढोणे,शशीकांत तारळेकर,मिलिंद चोथे,राम तारळेकर,अशोक रोकडे,विनोद तावरे,नितीन तारळेकर,संकेत तारळेकर,विकास वाघमोडे, प्रकाश मराठे,सुनिल लिपारे,डी के चोथे,यांच्यासह शहरातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या