आटपाडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्याचा राजकीय चौरंग केल्याशिवाय राहू नका : खासदार अमोल कोल्हे

आटपाडी मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या चा राजकीय चौरंगी केल्याशिवाय राहू नका. रांझ्याच्या पाटलाने स्त्रीवर अत्याचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाचाही मुला हिजा न ठेवता तो पाटील कोणत्या जातीचा आहे धर्माचा हे न पाहता त्याचा चौरंग केला होता आया बहिणींच्या अब्रूचे लचके तोडणारे आणि त्याला पाठीशी घालणाऱ्याचा राजकीय चौरंग करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन खासदार अमोलजी कोल्हे यांनी केले.

        महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या विटा येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

         कोल्हे पुढे म्हणाले की, भाजपने ईडी भीती घालून सर्व भ्रष्टाचारी नेते पक्षात घेतले. स्वार्थाचा चिखल करण्याचे पाप शिंदेच्या शिवसेनेने केले आहे. भोपाळच्या सभेत मोदींनी 70 हजार कोटीच्या जलसिंचनाच्या भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर अजित दादा गुलाबी जॅकेट घालून मोदीच्या मांडीवर बसले. विकासासाठी ही भूमिका घेतली असे सांगत सुटलेत. विकास केला का? 1600 चा डबा 2200 वरती, खोबरे 180 रुपये वर नेले, गॅस पेट्रोल डिझेल महागले. शेतीमालाला हमीभाव नाही, 18% जीएसटी लावून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत महिन्याला 200 शेतकऱ्यांचे सरण रचल्यानंतर कर्जमाफी देणार का ? सर्व औद्योगिक प्रकल्प गुजरातला नेले. साडेचार पाच लाख कोटीची गुंतवणूक झाली असती चार पाच लाख तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता.

       

               लाडका भाऊ ओवाळणीचे बॅनर लावत नाही. निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना आणून सत्ता मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. विकास आघाडीने पंचसूत्री आणली आहे. लक्ष्मी योजना महिन्याला 3000, वर्षाचा 6 गॅस मोफत, शेतकऱ्यांना तीन लाखाचे कर्ज माफ, तरुणांना सुशिक्षित बेरोजगार भत्ता, या योजना राबवणार आहे त्यासाठी हा विकास आघाडीचे सरकार येणे गरजेचे आहे.जसा वाढपी आपला असावा तसा आचारी पण सांगली जिल्ह्यातला असणार आहे.

      उमेदवार वैभव दादा पाटील म्हणाले की, विरोधकांनी भूल थापा देऊन 7 निवडणुका लढवल्या. सातत्याने सत्ता जनतेने देऊनही किती रोजगाराच्या संध्या उपलब्ध केल्या. 50 लोकांना तरी कामाला लावले का? आणि आमच्या संस्थांची आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची मापे काढता. तुम्हाला मापे काढण्याचा नैतिक अधिकार नाही असे प्रखड मत व्यक्त केले.

    स्वागत प्रास्ताविक एडवोकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, सानिका शिंदे, शिवसेनेचे संजय विभुते, पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड, आदींनी मनोगत व्यक्त केली.

    या कार्यक्रमाला स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे बंधू सुरेश पाटील, आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, शिवप्रतापचे विठ्ठल साहेब साळुंखे, पक्ष निरीक्षक अन्वर सावनुरकर, राजेंद्र माने, विकास माने , संजय मोहिते, नितीनराजे जाधव, पृथ्वीराज बाबा पाटील, हरिभाऊ माने संदीप मुळीक, राजुशेठ जानकर रेखाताई पवार, शिवाजी शिंदे पद्मसिंह पाटील आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आभार हणमंतराव देशमुख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या