९ फेब्रुवारीला ४३ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. सकाळी ९.३० वाजता मा अवधूत कुंभार मुख्याधिकारी नगरपंचायत कवठेमंकाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे. कवी आनंदहरी यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन आहे. त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत. दुसरे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉ. ओमप्रकाश शेटे करणार आहेत. आमदार डॉ. विश्वजीत कदम कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे प्रमुख पाहुणे आहेत. स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील आहेत. तिसऱ्या सत्रात रात्री ८.३० वाजता कथाकथन व संमेलन समारोप आहे. प्रमुख पाहुणे प्रा. सिद्धेश्वर सपकाळ असून प्रा. विश्वनाथ गायकवाड, नागु विरकर, जयवंत आवटे यांचे कथाकथन आहे.
प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार प्रा. विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होनमाने व आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके, यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वांड्मय निर्मिती पुरस्कार डॉ. मुरहरी केळे यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर व साहित्यिक द.का.हसमनीस उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार प्रा.डॉ. विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे. साहित्यिक सुनील दबडे यांच्या 'बनगी आणि बिरमुटं' कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या 'पर्यावरणाचा छोटा रक्षक"एकांकिका संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे.डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे , हर्षवर्धन मेटकरी यांच्यासह साहित्य सेवक संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले.
0 टिप्पण्या