पुण्याचा कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. पृथ्वीराज मोहोळ ६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. यामध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळ आणि कुस्तीगीर महेंद्र गायकवाड यांच्यात सामना झाला. कुस्तीगीर पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली. नंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांशी वाद घातल्याबद्दल महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
यासोबतच, उपांत्य फेरीत मोहोळ आणि कुस्तीगीर शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला आणि त्यात पृथ्वीराज मोहोळ यांना पंचांनी विजेते घोषित केले आणि त्यानंतर, या सामन्यातही असाच वाद पाहायला मिळाला. त्यानंतर, संतप्त शिवराज राक्षे पंचांशी वाद घालताना आणि त्यांना लाथा मारताना दिसत आहेत. शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथा मारल्या आणि म्हटले की ते मागे हटले नाहीत. यामुळे, कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले आहे.
आता, चंद्रहार पाटील यांनी या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रहार पाटील म्हणाले की, काल जो प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरोखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजन खरं आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 मध्ये माझ्याबाबतीत घडलेला होता. शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय. कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. कारण काल ज्यावेळेस रेफरीनं शिट्टी वाजवली त्यावेळेस आपण हात खाली घालून बघतो पैलवानाची पाठ टेकली का नाही टेकली आणि इथं नुसतं खाली वाकून बघतोय तरी त्यांनी शिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहळची कुठेच चुकी नाही. मला असं वाटतंय कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभा राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे. कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळ असेल यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवर कुठला आक्षेप नाही. तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होतं डोळ्याला की पाठ टेकलेली नाही. परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टीव्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही. पण तरीसुद्धा पंचाने निर्णय दिला पण आज ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरी मध्ये पृथ्वीराज मोळ हा महाराष्ट्र केसरी झाला हे सत्य आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. कारण परत कुस्ती होईल, परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही. कारण पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. कारण ह्या एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनल पर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे.
आज तो महाराष्ट्र केसरी झालाय त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं कालही मी अभिनंदन केलंय आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो 100% चुकीचा आहे आणि ही 100% चुकी कुस्तीगीर संघाची नाही. कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही. तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्या एकट्या पंचाची चुकी आहे. ह्या पंचाला खरोखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत. असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे 2009 आणि जी मानसिकता काय होती एका पैलवानाची कारण शिवराज राक्षे असेल किंवा मी असेल. 2009 मी 15-20 वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो आणि अशी 15-15, 20-20 वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेतो. पण शिवराजच्याबाबतीत जो प्रकार घडला तो चुकीचा आहे. ही चुकी त्या पंचाची आहे. असे चंद्रहार पाटील म्हणाले.
0 टिप्पण्या