तासगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; नुकसान झालेल्यांची पूर्ण ताकदीने मदत करू : आमदार सुहास बाबर


सांगली जिल्ह्यात काल रात्री पावसाने धुमाकूळ घातला अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडला. तासगाव तालुक्यातील पेड व परिसरात गुरुवारी रात्री अचानक मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे पेड व मांजरडे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. पेडसह किल्लापूर, नृसिंहपुर, मोराळे, मांजर्डे या गावांचा संपर्क तुटलाय. येथील कापूर वड्याला मोठा पूर आल्याने पेड गावात देखील पाणी शिरलं तसेच पेड, तासगाव रोड देखील पुरामुळे बंद झाल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. पुरामुळे गावातील व्यापारी व उद्योग दुकानांच देखील मोठं नुकसान झाल्याच समजत. पेडच मांजरडे मध्ये देखील पुराच पाणी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात शिरल्यामुळे व्यापारी दुकानांच नुकसान झाल. पेड, किल्लापूर, नृसिंहपुर, घोटी, मांजर्डे, मोराळे या गावांना ढगपुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसला. 

पेडमधील स्मशान भूमीचे संरक्षण भिंत देखील रात्री पडली आहे. तसेच काही जनावर देखील पुरात वाहून गेल्याची चर्चा आहे. रात्री पुराच पाणी बघण्यासाठी ग्रामस्थानी गर्दी केली होती. त्यामुळे गेल्या काही दशकात इतका मोठा पाऊस कधी पडला नव्हता अशी चर्चा पेड परिसरात होताना दिसत आहे. याची पाहणी खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी केली. रात्री पाऊस पडल्यानंतर लगेच सकाळी आमदार विसापूर सर्कल मध्ये दाखल झाले. त्यांच्यासह प्रशासनाचे लोकही या पाहणीमध्ये आले होते. विसापूर सर्कल मधील पेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाल होत. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश यावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

यावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले पेड, नृसिंहपुर, कचरेवाडी या भागामध्ये आणि खानापूर तालुक्यातल्या काही भागांमध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊसून झाल्याने खूप मोठं नुकसान झाल आहे. जनावरांचा काही ठिकाणी मृत्यू झालाय, रस्त्यांच खूप मोठं नुकसान झाल आहे. पेडच्या ओड्याकडील जी सगळी दुकान होती जी व्यवसाय होते त्यांचही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच खूप मोठं नुकसान झाले बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत. बिडिओ साहेब, तहसीलदार साहेब आम्ही सगळे इथे पाहणी करायला आलोय कलेक्टर साहेबांशी माझ यासाठी बोलणं झाले मी सीएम साहेबांशी डीसीएम साहेबांशी थोड्यावेळात बोलून घेतो आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि पूर्ण ताकतीने त्यांना मदत करायची जबाबदारी आमची आहे. फक्त थोडं अजून दोन दिवस पावसाचे दिलेले आहेत त्यामुळे माझी ह्या सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की थोड काळजीपूर्वक इथून पुढे तुम्ही थांबावं आणि या या लोकांनी काळजी न करता आम्ही त्यांच्या पाठीशी ठांमपणे उभा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या