विटा : 21 जून 2025 रोजी खानापूर तालुक्यातील खानापूर मंडळ येथे तहसील कार्यालय विटा मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना थेट व तात्काळ सेवा देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात महसूल, कृषी, पंचायत समिती, नगर पंचायत, आरोग्य, पुरवठा, निवडणूक आणि संजय गांधी विभागांमार्फत महसूल विभागामार्फत विविध दाखले, रेशन कार्ड, लक्ष्मी मुक्ती योजना आदेश, रस्ता आदेश, वारस नोंद फेरफार यांचे वितरण करण्यात आले.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बियाणे वाटप, तसेच एका लाभार्थ्याला ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
नगर पंचायत व पंचायत समिती मार्फत घरकुल योजनांचे आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले.
पंचायत समिती मार्फत बचत गटांना एकूण ₹15 लाखांचे कर्ज धनादेश स्वरूपात वितरित करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड चे वितरण
तसेच पुरवठा, निवडणूक आणि संजय गांधी योजना विभागांमार्फत विविध अर्ज स्वीकृत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सुहास नाना शिंदे, राजाभाऊ शिंदे, डॉ. उदय हजारे, खानापूर नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा तसेच इतर मान्यवर सह प्रांत अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील , मुख्याधिकारी वैभव हजारे, कृषी अधिकारी कुंभार, नायब तहसीलदार व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सुहास बाबर यांनी अशा उपक्रमांचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले व अधिकाधिक लोकांपर्यंत शासकीय सेवा पोहचवण्यासाठी यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन केले.
खानापूर मंडळातील सुमारे ५०० नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. सदर शिबिराच्या नियोजनात मंडळ अधिकारी फैयाज मुल्ला, ग्राम महसूल अधिकारी श्रीकृष्ण निकम , सागर भोसले, सूरज पाटोळे, शुभम यादव व मंडळातील महसूल सेवक यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नायब तहसीलदार विजय साळुंखे यांनी तर आभार नायब तहसीलदार अभिजीत हजारे यांनी मानले.
0 टिप्पण्या