गेल्या काही काळापासून तासगाव आणि पेड भागांत चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. दिवसा शेतात किंवा परिसरात फिरून चंदन तस्कर कोणत्या झाडांना लक्ष्य करायचे याची निश्चिती करतात. त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ती झाडे कापून घेऊन जातात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, कारण चंदनाचे झाड हे आर्थिकदृष्ट्या मौल्यवान मानले जाते.
या वाढत्या चंदन चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री अपरात्री आपल्या शेतातील झाडांचे रक्षण कसे करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. पोलिसांनी या चंदन तस्करांवर कडक कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी त्यांची मागणी आहे. यामुळे रात्रीच्या वेळीही मोठ्या क्षेत्रावर नजर ठेवणे शक्य होईल आणि तस्करांना वेळीच पकडणे सोपे होईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
0 टिप्पण्या